राज्य उत्पादन आयुक्तांच्या पथकाच्या अवैध दारूविरोधी अकोल्यात धाडी संगमनेर उत्पादन कार्यालय अकार्यक्षम झाले का? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्य उत्पादन आयुक्तांच्या पथकाच्या अवैध दारूविरोधी अकोल्यात धाडी संगमनेर उत्पादन कार्यालय अकार्यक्षम झाले का?

अकोले : प्रतिनिधी                                                                       अकोले तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट ग...


अकोले : प्रतिनिधी                                                              


  1.        
    अकोले तालुक्यातील अवैध दारूच्या तक्रारींची दखल थेट गृहमंत्री, उत्पादन शुल्क आयुक्त यांनी घेऊन आयुक्तांनी नाशिक उत्पादनशुल्क अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पथक दोन दिवस अकोल्यात पाठवले.या पथकाने अकोले,राजूर,कोतुळ येथील अवैध दारुबाबत धाडी घातल्या व अकोले व राजूर येथे कारवाया केल्या आहेत व इथून पुढेही हे पथक सतत तालुक्यावर लक्ष ठेवून असेल व तक्रारींची दखल घेणार आहे


लॉकडाऊन मध्ये गरीब कुटुंबात रोजगार नसल्याने दारूसाठी पुरुषवर्ग महिलांकडून पैसे हिसकावून घेऊन मारहाण करतो आहे.अशा काळात अवैध विक्री पूर्णपणे बंद असणे गरीब कुटुंबासाठी आवश्यक आहे असे पत्र आंदोलनाने गृहमंत्री व उत्पादन शुल्क आयुक्त यांना लिहीले होते 

          अकोल्यातील डोंगरे यांच्या दुकानाबाहेर दारू विक्री करताना या पथकाने कारवाई केली व राजूर येथील अवैध विक्रीवर गुन्हा दाखल केला. या पथकातील नगर जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने राजूर,कोतुळ येथे दारू विक्रेत्याना सावध केल्याने कारवाई वर परिणाम झाला हे पुराव्यानिशी आंदोलनाने उत्पादन शुल्क आयुक्तांना लक्षात आणून दिले. 


                          आयुक्तांना राज्यस्तरावरून पथक पाठवावे लागते याचाच अर्थ संगमनेर येथील उत्पादनशुल्क कार्यालय अकार्यक्षम असल्याचे व अवैध दारूला पाठीशी घालत असल्याचे वास्तव पुढे येते आहे. येथील अधिकारी तातडीने बदलावेत अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने केली आहे. 

इतक्या कारवाया होऊनही पुन्हा कालपासून नदीपुलाजवळ चोरून विक्री सुरू झाली आहे. अकोले स्मशानभूमीत खुलेआम दारू विकली जात आहे. एकीकडे शोकाकुल नातेवाईक उभे असताना तिथे दारू विकणाऱ्या या विक्रेत्याना अकोल्याचे नवीन पोलीस निरीक्षक यांनी पायबंद घालावा व अकोले व राजूर मधील  गेल्या ५ वर्षातील झालेल्या कारवाया एकत्र करून त्या आधारे सतत तक्रारी येत असलेल्या दुकानांचे लायसन रद्द करावे व राजूरमध्ये तडीपारी करावी अशी मागणी दारूबंदी आंदोलनाने चे  जिल्हाध्यक्ष ऍड रंजना गवांदे, निलेश तळेकर,संतोष मुतडक,संदीप दराडे, दत्ता शेणकर, जालिंदर बोडके,डॉ. भाऊराव उघडे व हेरंबकुलकर्णी यांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत