राहुरी/वेबटीम:- आज दिनांक २४ जून रोजी मौजे वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत बोलताना तज्ञ कृषी पर्यवेक्...
राहुरी/वेबटीम:-
आज दिनांक २४ जून रोजी मौजे वळण येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित कृषी संजीवनी मोहीमेंतर्गत बोलताना तज्ञ कृषी पर्यवेक्षक श्री शिवाजी कोरडे म्हणाले की कापूस लागवड करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी शेतकऱ्यांना शेतीशाळा, शेतीचे नियोजन व खर्चात बचत याबाबत खेळाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक चंद्रकांत म्हसे यांनी खताची बचत, सोयाबीन पिक व्यवस्थापन व शासनाच्या विविध योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, कृषी पर्यवेक्षक राणू आंबेकर, सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गडधे,मंगेश बनकर, आकाश गोरे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे,सदस्य,अशोक कुलट, बाबासाहेब खुळे,दत्तात्रय खुळे,ज्ञानेश्वर खुळे, युनुस शेख,सारंगधर खुळे,अर्जुन आढाव,बाळासाहेब खुळे, बाबासाहेब मकासरे, अशोक काळे, फकीरचंद फुणगे आदी उपस्थित होते. हरिभाऊ डमाळे यांनी आभार प्रदर्शन केले. किसान कृषी सेवा केंद्र यांचे विशेष सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत