कोपरगाव/प्रतिनिधी:- पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या जुन्या टाकळी रस्त्यापासून आढाव वस्ती, पवार वस्ती, शंकर नगर, साबळे वस्ती,...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
पालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या जुन्या टाकळी रस्त्यापासून आढाव वस्ती, पवार वस्ती, शंकर नगर, साबळे वस्ती, कुंधारे वस्ती व रानोडे वस्ती येथील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांनी सोमवारी (ता.३०) नगराध्यक्ष विजय वहाडणे व उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांना निवेदन देऊन केली आहे.
सदर निवेदनात नागरिकांनी म्हंटले आहे की, जुना टाकळी रस्ता, आढाव वस्ती, पवार वस्ती, शंकर नगर, साबळे वस्ती, कुंधारे वस्ती व रानोडे वस्ती येथील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झालेली आहे. सध्या पावसाळा सुरू असून, नागरिकांना चिखलातून वाट शोधून प्रवास करावा लागतो. तसेच या रस्त्यावरील पूल देखील कधीही कोसळू शकतो. यावरून रोज हजारो नागरिक प्रवास करतात. त्यामुळे रस्ते आणि पुलाचे काम प्राधान्याने करावे, अशी मागणी बाळासाहेब आढाव, रमेश आढाव, किरण आढाव, निखील आढाव, अनिष कपिले, सिद्धेश कपिले, योगेश कुंढारे, राकेश पवार, संतोष पवार, विनय पवार आदिंनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत