राहुरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव):- राहुरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखाना कामगारांनी थकीत पगरप्रश्नी आंदोलन केले असता गुरूवार ९ सप्टेंबर रोजी एक प...
राहुरी फॅक्टरी(श्रीकांत जाधव):-
थकीत पगारासाठी तनपुरे कारखाना कामगारांनी १४ दिवस आंदोलन केले. यावेळी माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांनी मध्यस्थी करत माजीमंत्री राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय विखे यांच्याशी चर्चा करून आंदोलन मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. थकीत पगारांपैकी एक पगार ९ सप्टेंबर रोजी तर दुसरा पगार १७ सप्टेंबर रोजी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
त्यानुसार आज गणपती बाप्पा आगमनाच्या दिवशी कामगारांना एक पगार मिळाल्याने सर्वांनी आंनद व्यक्त केला. यावेळी कामगार बांधवांनी खा.डॉ.सुजय विखे, माजीमंत्री शिवाजी कर्डीले, चेअरमन नामदेव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय ढुस, सर्व संचालक मंडळ तसेच उपोषण मिटवण्यासाठी कामगार व व्यवस्थापन यांच्यात समनव्य घडवून आणण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न करणारे भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, पत्रकार विनीत धसाळ, ज्ञानेश्वर विखे, मनोज गव्हाणे यांचे आभार मानले.
दरम्यान डॉ.तनपुरे कारखाना कार्यस्थळावर आज खा.सुजय विखे यांनी भेट दिली. यावेळी कामगार बांधवानी त्यांचे आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत