देवळाली नगरपालिकेत भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरु - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली नगरपालिकेत भाजपाला रोखण्यासाठी स्थानिक नेत्यांच्या बैठका सुरु

देवळाली प्रवरा(वेबटीम):- येथील नगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीतून सत्ताधारी भाजप पक्षाच्या ताब्यातून नगरपालिका काढून घेण्यासाठी व...

देवळाली प्रवरा(वेबटीम):-


येथील नगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीतून सत्ताधारी भाजप पक्षाच्या ताब्यातून नगरपालिका काढून घेण्यासाठी विविध पक्षाच्या प्रमुखांनी गोपनीय बैठका चालू केल्या असून काँग्रेस, आरपीआय , शिवसेना या तिन्ही पक्ष्याच्या स्थानिक प्रमुखांनी नगर-मनमाड मार्गावरील एका आलिशान हॉटेल मध्ये आघाडीची गणेश उत्सव मुहूर्तावर चर्चा घडवून आणली आहे. नगरपालिका निवडणुकीत राज्यातील सत्तेचे समीकरण  महाविकास आघाडी होणार की जो-तो स्वबळावर निवडणूक लढविण्याचा चंग बांधेल हे अद्याप स्पष्ट होत नाही.

देवळाली प्रवरातील विरोधी पक्षांनी या पंचवार्षिक निवडणूकीत भाजपचा घोडा अडवला नाहीतर पुन्हा ५ वर्ष विरोधात थांबावे लागणार आहेत.सध्याचे विरोधी पक्ष वज्रमुठ बांधून एकमेकांच्या संपर्कात येत आहे. त्यामुळे नगरपालिका आगामी निवडणुकीत रंगत येणार आहे.


देवळाली प्रवरा नगरपालिका सन २०१६ निवडणुकीत भाजपला १६ नगरसेवक व नगराध्यक्ष अशी एक हाती सत्ता मिळाली. तर राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली होती.काँग्रेसला खातेही खोलता आले नव्हते. दरम्यान भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याने हुकमीराजकारण सुरू झाले. सत्ताधारी गटातील नगरसेवकांना कोणताच अधिकार नव्हता. 

त्यामुळे ३ ते ४ नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला होता.परंतु त्यांची बोळवण करून समजूत काढण्यात आली. नगरपालिकेचा सर्वस्वी कारभार नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्यापेक्षा गटनेते सचिन ढुस यांच्या हातात होता. त्या पाठोपाठ माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांना काही प्रमाणात अधिकार असले तरी  मात्र नगरसेवकांच्या मागणीनुसार पूर्तता ते करू शकले नसल्याने नगरसेवकांची नाराजी त्यांच्यावर ओढवली आहे. नगराध्यक्ष कदम नगरपालिकेचे कोणतेही काम असले तरी  ढुस व संसारे यांना भेट घेण्याचा सल्ला देत होते. गेल्या ५ वर्षात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात उभी केली असली तरी मतदार मात नाराजीच्या भूमिकेत दिसत आहे. मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर मोठे आव्हान असणार आहे.


दरम्यान  देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूकित भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली आहे. या बैठीत  काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, आरपीआय उत्त नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, मंत्रालयातील माजी सचिव दत्ता कडू या चौघांनी ठराविक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी नगर-मनमाड मार्गावरील एका आलिशान हॉटेलमध्ये बैठक घेतली.

 
या बैठकीत महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी व शिवसेना व इतर बहुजन पक्षाचे स्थानिक प्रतिनिधी अनुपस्थित होते. त्यामुळे ही महाविकास कशी म्हणायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्व विरोधक अर्थात महाविकास आघाडी   झाली तरच भाजपला रोखू  जाऊ शकते. नगरपालिकेत भाजपाला रोखण्याची  हीच वेळ आहे, असे खासगीत सर्वत्र बोलले जात आहे.



बैठक झाली,पण चाचपणीसाठी- चव्हाण

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नगरपालिका निवडणुकी संदर्भात आम्ही चौघांनी बैठक घेतली नाही. कुणाला बरोबर घ्यायचे कुणाला नही याच्या चाचपणीसाठी आम्ही एकत्रित बसलो होतो.ही निवडणुकींसदर्भातील बैठक असली तरी केवळ चाचपनी करण्याचा प्रयत्न आहे. वार्डनिहाय बैठका घेऊन मतदार व पक्षातील कार्यकर्त्यांचा मते जाणून घेण्यात येऊन योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. राज्यातील सत्तेची समीकरणाप्रमाणे महाविकास आघाडी होणे हे राज्यातील नेत्यांवर अवलंबून आहे.कोणत्याही एका पक्षाने  जर स्वबळाचा नारा दिला तर सर्वचजण स्वबळावर निवडणूक लढवतील.

 

पक्षश्रेष्ठींच्या निर्णय नुसार महाविकास आघाडी- कदम

राष्ट्रवादीचे प्रांत सदस्य अजित कदम यांनी बोलताना सांगितले की, शनिवारी झालेल्या बैठकीबाबत मला कोणतीही कल्पना नाही.राष्ट्रवादीचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता बैठकीला उपस्थित नव्हता. राष्ट्रवादी सध्यातरी स्वबळावरचा विचार करत आहे.परंतु भाजपला रोखण्यासाठी भविष्यात आघाडी करण्यातबाबत श्रेष्ठींची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

 महाविकास आघाडी करण्यासाठी शिवसेनेत वरीष्ठ पदाधिकारी आहेत;कराळे

शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे म्हणाले की, शिवसेनेचे स्वयंघोषीत पदाधिकारी म्हणून दत्ता कडू या बैठकीस उपस्थित होते.परंतू त्यांच्या मुलाने गेल्या पंचवार्षिक मध्ये शिवसेनेत प्रवेश करुन नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती..त्यावेळी दत्ता कडू मंञालयात सचिव पदावर होते. नोकरीमुळे शिवसेनेत प्रवेश केला नाही.आज माञ ते शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे भासवत असले तरी ते स्वयंघोषित पदाधिकारी आहेत.मी स्वतः सोशल मिडियावरून सांगितले की, नगरपालिका निवडणुकी संदर्भात झालेल्या बैठकीशी शिवसेनेचा कोणताही संबध नाही असे त्यांनी सांगितले.स्वयंघोषित होवून शिवसेने बाबत कोणी ही कोणता निर्णय जाहिर करु नये असे कराळे यांनी सांगितले.


दरम्यान या बैठकीत उपस्थित असलेले दत्ता कडू यांनी ' आम्ही देवळालीकर' या ग्रुपवर  बैठकीच्या पोस्ट चालू झाल्यानंतर सध्या निवडणूकीचे वातावरण सुरू असल्याने राजकारण विरहित हा ग्रुप राजकीय भूमिका मांडण्यासाठी केला आहे. या ग्रुपवर राजकीय अड्डा होऊ नये म्हणून निवडणूक होईपर्यंत याचा वापर राजकारणासाठी होऊ नये म्हणून तूर्त हा ग्रुप बंद करण्यात येत आहे.अशी पोस्ट टाकून. या ग्रुपच्या आलेल्या बैठकीच्या संदेशाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले. शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे यांनी आम्ही देवळालीकर या ग्रुपवर टाकलेल्या पोस्ट नंतर हा ग्रुप बंद करण्यात आला आहे. बैठकीला उपस्थित असणारे चारही नेत्यांना आपली चूक या पोस्टनंतर लक्षात आली आहे. आघाडी स्थापन करायची तर सर्वांना बरोबर घेऊन करावी लागणार आहे. आता झालेली चूक ही  पुन्हा पुढे होणाऱ्या बैठकीत होणार नाही. याची दक्षता घेण्यात येत असल्याने पुढील होणारी बैठक सर्वाना सामावून घेण्यासाठी हे  चारही पदाधिकारी यांनी एकमेकांना सांगत आहे. सर्वांना एकत्र घेऊन भाजपचा घोडा थांबविण्याची किमया करून दाखवावी लागणार आहे.

             "                             "



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत