संतुलित आहार काळाची गरज– डॉ. श्यामसुंदर कौशिक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संतुलित आहार काळाची गरज– डॉ. श्यामसुंदर कौशिक

शेवगाव(वेबटीम) श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने अमळनेर ता. नेवासा येथे “जागतिक अन्न दिवस” स...

शेवगाव(वेबटीम)


श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने अमळनेर ता. नेवासा येथे “जागतिक अन्न दिवस” साजरा करण्यात आला. भारत देशाच्या स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने भारत सरकारने विविध महत्त्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून १६ ऑक्टोंबर हा दिवस “जागतिक अन्न दिवस” म्हणून संपूर्ण जगात साजरा होत आहे. माणसांनी निरोगी असणं आणि निरोगी असण्यासाठी सकस अन्न माणसांनी आपल्या जेवणात घेणं ही काळाची गरज असले चे प्रतिपादन असे प्रतिपादन केव्हीके दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी अमळनेर येथील आयोजित जागतिक अन्न दिवस कार्यक्रमात केले. शेतात कष्ट करत असताना पुरुष तसेच महिलांचे कुठेतरी आहाराकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होते. 



त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. याकरिता शेतकऱ्यांनी स्वत: साठी आणि कुटुंबासाठी पोषण परसबागेची जोपासना करावी ज्याप्रमाणे माणसामध्ये पोषण तत्वाची पूर्तता करण्यासाठी वेगवेगळ्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे जमिनीला पण तिच्या उत्पन्नासाठी वेगवेगळ्या सूक्ष्म अन्न द्रव्यांच्या संतुलित मात्राची आवश्यकता असते. जमिनीला योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळाल्यास जमिनीतून भरपूर उत्पन्न मिळते असे आवाहन डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केले. शेती व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांनी एकात्मिक पिक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतात संतुलित अन्न निर्माण ते कुटुंबासाठी वापरण्याचे केव्हीकेचे विषय विशेषज्ञ नारायण निबे यांनी सांगितले.



 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ. प. जंगले महाराज शास्त्री, महंत सुनिलगिरी महाराज, सभापती सूनील गडाख, नानासाहेब तूवर कर्णा साहेब पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शंभरहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत