कोपरगाव/वेबटीम:- सन्माननीय मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या संकट काळात राज्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत जनतेच...
कोपरगाव/वेबटीम:-
सन्माननीय मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी कोरोनाच्या संकट काळात राज्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत जनतेच्या हिताचे अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले व देशात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मुख्यमंत्री म्हणुन स्थान मिळवले. याच लोकप्रियतेचा भाजपला व त्यांच्या *बोलक्या पोपटांना* त्रास व्हायला लागला व एक एक पोपट गरळ ओकल्या सारखे बोलू लागला.
उध्दव साहेबांचे काम जनते पर्यंत पोहचू नये म्हणून भाजपने पाहिले कंगना राणावतला पुढे आणून साहेबांबद्दल अभद्र बोलायला लावले परंतू तिची काय आवस्था झाली हे भाजपनी बघितले आणि आता पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य पदार्थ व जीवनावश्क वस्तूंचे भाव केंद्रात सत्ता असतांना वाढवले व जनतेचे या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणुन *एका बेअक्कल बेडकाला* केंद्रीय मंत्री पदाचा तुकडा टाकला व जन आशिर्वाद यात्रा सुरु केली. आता या *बुट्ट्याचे* देखील उतरत्या वयात काय हाल झाले हे जनतेची पिळवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी अनुभवले.
मुळात भाजपला हे कळायला हवं होतं की, *पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्य पदार्थ व जीवनावश्क वस्तूंचे* भाव यांनीच वाढवले, तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून केंद्रांनीच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली तरी महाराष्ट्रातील भाजप नेते *दहीहंडी* मोठ्या प्रमाणात करण्याची भूमिका घेतात व भाजप शाषित एका ही राज्यात मंदिरं उघडले नसतांना महाराष्ट्रात मंदिरं उघडण्यासाठी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून *शंखनाद आंदोलन* केले जाते आणि हे सर्व फक्त भाजपनी वाढवलेल्या महागाईकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणुन रचलेला डाव आहे. मग यांना जन आशिर्वाद यात्रे मधून जनतेचे आशिर्वाद मिळतील की जनतेचा तळतळाट. खरंतर यात्रा व आंदोलने करून राज्यात कोरोना वाढवण्याचे काम भाजप नेते करत आहेत. भाजपच्या या सर्व अभद्र कार्याचे हिशोब मुंबई महानगरपालिकेत जनताच करेल व ह्यांची जागा यांना दाखवून देतील असे शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत