राहुरी(वेबटीम):- शासनाने ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान केले असून विद्यार्थ्यांना तातडीने भरपा...
राहुरी(वेबटीम):-
शासनाने ऐनवेळी आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान केले असून विद्यार्थ्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शरद म्हसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात शरद म्हसे यांनी म्हंटले की, २५ व २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आरोग्य विभाग भरती परीक्षा दि 24 सप्टेंबर 2021 म्हणजे परीक्षेच्या 1 दिवस अगोदर रद्द करण्यात आल्याचे उमेदवारांना कळविण्यात आले आहे. असे अचानक पने आणि तत्काळ परीक्षा रद्द करून आज लाखो तरुणाच्या आयुष्याचे आपण नुकसान करत आहात याच बरोबर बरेच परीक्षार्थी हे परीक्षा केंद्राच्या वाटेवर आहेत तर काही परीक्षा केंद्राच्या बाहेर झोपून रात्र काढत आहेत उद्याच्या सोनेरी भविष्याचा वेध घेताना प्रसंगी आज लाखो तरुण उपाशी मिळेल तिथे झोपून रात्र काढत आहे. एकीकडे भीषण बेरोजगारी च सावट तर दुसरीकडे असे अचानक धडकलेले सुलतानी संकट या मुले परीक्षार्थी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक तणावात जाणार आहेत. या तनावावाचे रूपांतर अतिशय भयानक होणार आहेत.
परीक्षेला बसणाऱ्या 8लाख विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवासाचा, राहण्याचा खर्च म्हणून प्रत्येकी 2 हजार रुपये देण्यात यावेत तसेच सरकारने न्यासा नावाच्या कंपनीला परीक्षा घेण्याचं कंत्राट दिल होत त्यांच्या कडून ही वसुली करावी अशी मागणी शरद म्हसे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत