अहमदनगर येथे युवा उद्योग व्यवसाय शिबीर संपन्न... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अहमदनगर येथे युवा उद्योग व्यवसाय शिबीर संपन्न...

अहमदनगर(वेबटीम) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, व रव...

अहमदनगर(वेबटीम)



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, व रविदासीया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर येथे युवा उद्योजक व्यवसाय शिबीर व युवा उद्योजक गौरव पुरस्कार सोहळा  आयुक्त, समाजकल्याण मा. डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.


           यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बार्टी संस्थेचे महासंचालक मा.धम्मज्योति गजभिये, अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष मा.दत्तात्रय बोरुडे, बार्टी संस्थेचे उपायुक्त मा. उमेश सोनवणे, समाज कल्याण विभाग, अहमनगर सहा. आयुक्त मा. राधा किसन देवडे, चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष मा.संजय खामकर, श्री. सोमनाथ जगताप, (जिल्हा व्यवस्थापक उमेद प्रकल्प) श्री. तात्यासाहेब जिवडे, (प्रकल्प अधिकारी MCED) श्री. दिलावर सय्यद, (प्रकल्प अधिकारी, बार्टी) संदीप फुंदे, (समाजकल्याण)  श्री. अतुल दवंगे (महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र) उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते युवाउद्योजकांचा गौरव करण्यात आला.


            या व्यवसाय प्रशिक्षण शिबिरात बोलताना आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले की तरुण पिढीने आज व्यवसायाकडे वळले पाहिजे. जेणेकरून भावी पिढी सक्षम बनेल. येणाऱ्या काळात सामाजिक न्याय विभाग आणि बार्टी मार्फत तालुका स्तरावर देखील रोजगार मेळावे, व्यवसाय उद्योग परिचय कार्यशाळा घेण्याचे नियोजन करणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्यात अनुसूचित जातीच्या युवकांसाठी  स्वयं सहायता युवा गट तयार करून त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे त्या व्यवसाय चे त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. त्याचबरोबर त्यांना उद्योग कसा सुरू करता येईल उद्योगाची नोंदणी पासून ते त्याचे मार्केटिंग पर्यंत चे सगळे नियोजन आणि प्रशिक्षण आम्ही या संस्थेमार्फत देणार आहोत यातून युवक व्यवसाय मध्ये  अधिक सक्षम होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत आहे त्यामध्ये परदेशात जाण्या येण्याचा खर्च, शालेय खर्च, लॅपटॉप, व इतर सर्व खर्च संस्था करत आहे त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी केले.


           यावेळी सुभाष मराठे, राजेश उंबरकर, संदीप सोनवणे, प्रीतम देसाई यांच्यासह चर्मकार समाजातील बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजय खामकर यांनी मानले.सूत्रसंचालन श्री. संतोष कानडे यांनी केले तर आभार श्री. सुभाष मराठे यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत