दैनदिन जीवनात नैराश्य , एकटेपणा याचे प्रमाण वाढतं चालले आहे. आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाचे न सुटणारे व्यसन लागले आहे. सोशल मीडियाचा व...
दैनदिन जीवनात नैराश्य , एकटेपणा याचे प्रमाण वाढतं चालले आहे. आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियाचे न सुटणारे व्यसन लागले आहे. सोशल मीडियाचा वापर आपण योग्यप्रकारे केला तर नक्कीच फायदा आपल्याना होतो. नवीन शिकायला मिळत, जगातल्या घडामोडीबद्दल कळतं.
पण ह्या व्यतिरिक्त सोशल मीडियाचे तोटे पण भरपूर प्रमाणात आहेत. आपल्या मेंदूमध्ये काय चालू आहे आणि आपल्याना काय हवं हे लगेच गूगलला कळतं. आपल्याना एखादा विडिओ आवडला तर त्याचेच जास्त प्रमाणात विडिओ आपल्याना बघायला मिळतात. ते विडिओ बघताना आपला मौल्यवान वेळ हा कधी निघून जातो कळतं नाही.
नातेवाईक , मित्र हे सगळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळ तर आले आहेत पण पूर्वी सारखा नात्यात गोडवा राहिलेला नाही. पूर्वी मोबाइल नव्हते तर लोक संवादासाठी आतुर होत पण आता मोबाईल आणि वेळ असूनही संवाद साधला जात नाही.
आजकालची तरुणपिढी आपले follower किती? पोस्ट वरती like कीती? Comments किती? हे बघण्यात वेळ वाया घालवतात. आपण दुसरीपेक्षा आणखी काय चांगलं करू शकतो ते करतात. नको ते कृत्य सोशल मीडियावरती करतात. थोडक्यात सांगायचे तर स्पर्धा वाढत आहे आणि टेन्शनही खूप वाढत चालले आहे. फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्राम आणि ट्विटर ह्यांनी मानवी मनावरती वर्चस्व केले आहे.
वेळ ही नदीसारखी असते एकदा की नदीच्या पाण्याला हात लावला की परत त्या पाण्याला आपल्याना हात लावता येत नाही.
लहान मुलांच्या हातात आई मोबाईल देते. मुलं रडायला लागले की , त्यांना शांत बसविण्यासाठी मोबाईल देणं योग्य नाही. मोबाइल मधून बाहेर पडणारे किरणं हे हानिकारक असतात. लहान मुलांची स्किन ही सेन्सिटिव्ह असते.
आपल्या मूलाला मोबाईल मधल सगळं कळतंय हे आजकालचे आई-वडील गर्वाने सांगताय. आई- वडिलांना हे कळत नाही की आपले मूल लहान वयात सोशल मीडियाच्या आहारी जाताय.
ना-ना प्रकारच्या गेम ते खेळताय. त्यांना खरे जीवनातील खेळ नको वाटताय. लहान मुलं physically आणि mentally डिस्टर्ब होत चालले आहे.
मूल शाळा, क्लास , मोबाईल ह्यामध्ये जास्त प्रमाणात गुंग आहे. मुलांचा आई-वडिलांचा संवाद राहिला नाही परिणामी मुलांमध्ये होणार बदल, त्यांच्यामध्ये संवाद न साधल्यामुळे निर्माण झालेली दरी, नैराश्य ह्याकडे दुर्लक्ष होत आहे.
बाहेरून जॉब वरून आल्यावर नवरा- बायको आपला जास्त वेळ सोशल मीडिया बघतात. त्यामुळे त्यांच्या नात्यातही ताण-तणाव निर्माण होतो.
अमेरीकामध्ये सगळ्यात जास्त लोक एकटे राहतात. त्याच एकच कारण लुप्त होत येणारी एकत्र कुटुंब पद्धती. कंटाळा आला म्हणून बाहेरून जेवण ऑर्डर करायच, त्यामुळे त्या जेवणात प्रेम नाही. E-commerce वेबसाईटचा जास्त प्रमाणात उपयोग केला जात आहे.
प्रेमाने , जिव्हाळ्याने, आपुलकीने विणलेली नाती आता उसवत चालले आहे.
सोशल मीडियावरती अर्धवट माहिती वाचून एखाद्या महापुरुषाला किंवा व्यक्तीला चुकीचं ठरवणं , घृणा, मत्सर , भेद निर्माण होतोय.
क्षणात आपल्या घरामध्ये काय घडतंय हे आपल्याआधी लोकांना कळतंय हे सोशल मिडिया मार्फत.
जागतिक मातृदिनाचे सगळ्यांनी स्टेटस टाकले पण खरचं आपण आपल्या जीवनात त्याच्याशी संवाद साधतो का? जेवढं प्रेम स्टेटसला असत तेवढं त्यांना देतो का? आई-वडीलासोबत सुसंवाद साधा कारण त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे.
कार्यक्रमामध्ये गेल्यावर आपला मोबाइल थोड्यावेळा करता सुद्धा बाजूला ठेवत नाही. तिथं लोक स्वतःला मी खुप व्यस्त आहे असा दाखवायचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियाने न दिसणाऱ्या बेड्या पायात घातलेल्या आहेत. सोशल मीडियामुळे मूल सेक्सकडे जास्त attract होतानी दिसताय.
आधुनिकता खूपच पुढं जात आहे पण त्यात तोटा होताना दिसतोय. Rape, ,Mental Harassment ,लहान वयात पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
सोशल मिडीयाचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होताना दिसतोय. मोबाइल जणू आपल्या आयुष्यातील अत्यावश्यक गोष्ट बनून गेला आहे.
आजकाल सर्वांना गरज आहे ती, एकत्र कुटुंब पद्धत स्विकारण्याची, नाते-संबंध जपण्याची, लहान मुलांवर संस्कार करण्याची तेव्हा तर हा समाज पुन्हा जिवंत होईल.
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत