दूषित पाण्यामुळे बारागाव नांदूर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दूषित पाण्यामुळे बारागाव नांदूर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात?

राहूरी(प्रतिनिधी)  राहुरी तालुक्याचा नव्हे तर अहमदनगर जिल्ह्याची तहान भगवणाऱ्या मुळा धरणाच्या भिंती लगत असणाऱ्या बारागांव नांदूर गावाच्या ग्...

राहूरी(प्रतिनिधी) 



राहुरी तालुक्याचा नव्हे तर अहमदनगर जिल्ह्याची तहान भगवणाऱ्या मुळा धरणाच्या भिंती लगत असणाऱ्या बारागांव नांदूर गावाच्या ग्रामस्थांना पिण्यासाठी दूषित पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  बारागांव नांदूर ग्रामपंचायत च्या वतीने येथील गोपाळे वस्तीवर पाणी पुरवठा केला जातो मात्र गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दुर्गंधी युक्त पाणी नळाद्वारे येत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे,दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक पोट दुःखी सारख्या आजाराने ग्रासले आहेत.

    याबाबत ग्रामपंचायत प्रशासन कडे वेळोवेळी तक्रार करून देखील या गंभीर घटनेची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ खूप संतप्त झाले आहेत, नळाला येणारे दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी अनेक  ग्रामस्थ थेट राहूरी हुन पाणी आणत आहेत.

   बारागांव नांदूर ग्रामपंचायत ने याबाबत दखल घ्यावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा कैलास गोपाळे, रोहन गोपाळे,दीपक गोपाळे,शरद पवार,सतीश कोहकडे यांनी दिला आहे.


दूषित पाणी येत असल्याच्या वेळोवेळी तक्रार करूनही त्याची दखल न घेणे म्हणजे ग्रामस्थांचे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे.हा प्रकार जाणून बुजून केला जात आहे,ग्रामपंचायत प्रशासनाच्या संबंधीताना याची किंमत मोजावी लागेल.

गणेश गोपाळे (चेअरमन-विश्वमनी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत