कोपरगाव(वेबटीम) पावसाळ्यापूर्वी सुभाष नगर भागातील गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी नगर पालिकेला के...
कोपरगाव(वेबटीम)
पावसाळ्यापूर्वी सुभाष नगर भागातील गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे अँड.नितीन पोळ यांनी नगर पालिकेला केली.
या पत्रकात पोळ पुढे म्हणले की,मागील काही दिवसांपूर्वी सुभाष नगर भागात बऱ्याच ठिकाणी नळ्या टाकून बंदिस्त गटारीचे काम झाले आहे मात्र सदर गटारींना योग्य उतार दिलेला नाही तसेच रस्त्याची कामे झाली काही ठिकाणी पेव्हीन ब्लॉक बसवले आहेत या भागात राहणाऱ्या नागरिकांची घरे व त्यांचे दरवाजे खाली असून रस्ते उंच झाले आहेत त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही त्यामुळे मागील वर्षी अनेक घरात पाणी शिरून गोरगरीब कुटुंबातील नागरिकांचे हाल झाले
लवकरच पावसाळा सुरू होईल त्या पूर्वी या भागातील गटारी स्वच्छ करून घ्याव्यात तसेच ज्या ठिकाणी रस्त्यावर साचलेले पाणी गटारीत जावे म्हणून ढापे बसवले आहे त्यात माती साचली असून ती स्वच्छ करून घ्यावी त्यामुळे भविष्यात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून नुकसान होणार नाही
तरी पावसाळ्यापूर्वी सुभाष नगर भागातील गटारी स्वच्छ कराव्यात ही अन्यथा या विषयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची दखल असे या निवेदनात अँड.नितीन पोळ यांनी म्हटले होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत