राहुरी(वेबटीम) धरणग्रस्त सेवा संघाच्या माध्यमातून धरणग्रस्त, भूमिहीन, प्रकल्पग्रस्त शेतकरी, गायरान जमीनधारक, पीडित व शोषितांना न्याय देण्य...
राहुरी(वेबटीम)
धरणग्रस्त सेवा संघाच्या माध्यमातून धरणग्रस्त, भूमिहीन, प्रकल्पग्रस्त शेतकरी, गायरान जमीनधारक, पीडित व शोषितांना न्याय देण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठी सर्व माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. अद्याप अनेकांनी आपले कागदपत्रे तथा तत्सम माहिती आमच्याकडे दिली नाही.त्यांनी ती त्वरित जमा करावी असे आवाहन धरणग्रस्त सेवा संघ महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अँड.सिंड्रेला परेरा यांनी केले आहे.
याबाबत पुढे बोलताना परेरा म्हणाल्या की, भूमिहीन व कष्टकरी यांना न्याय मिळावा यासाठी धरणग्रस्त सेवा संघाच्यावतीने जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. अभ्यासक मंडळी व मार्गदर्शक यांच्या योग्य सल्ल्याने हे काम पूर्णपणे तडीस नेण्यासाठी धरणग्रस्त सेवा संघ कटिबद्ध आहे. मात्र हे सर्व होत असताना आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्यासाठी कागदपत्रे व इतर माहिती संबधित प्रकल्प व अन्य व्यक्तींनी सादर करावी असे अँड.सिंड्रेला परेरा यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत