राहुरी फॅक्टरी(वेबटीम) नगर- मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने या सर्व गोष्टीला ठेकेदार जबाबदार...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
नगर- मनमाड रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने या सर्व गोष्टीला ठेकेदार जबाबदार असून त्या विरोधात राहुरी फॅक्टरी येथील शांती चौक मित्र मंडळ व विविध सामाजिक संघटनाच्यावतीने सोमवार 23 मे रोजी सकाळी फॅक्टरीतील ताहाराबाद चौकात रस्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा महसूल व पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात म्हंटले की, अहमदनगर- मनमाड राज्य महामार्गाचे काम संथगतीने सुरू असून बऱ्याच ठिकाणी रस्ता उकरून ठेवलेला असून काम ठप्प आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असुन अनेक प्रवाशांचा त्यामुळे मृत्यु झाला आहे. हा रस्ता जणु मृत्यूचा सापळा झाला आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदारांने कामाकडे अजिबात लक्ष नसून प्रवाशांच्या मुत्युला संबंधीत ठेकेदार जबाबदार असुन त्याविरोधात मुत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना (कुंटूबियांना) न्याय देण्यासाठी सोमवार २३ मे रोजी सकाळी राहुरी फॅक्टरी येथील ताहाराबाद चौकात शांती चौक मित्र मंडळ व विविध सामजिक संघटनांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, आरपीआय राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, हर्षद ताथेड, प्रकाश सोनी, नितीन डंबाळे आदिंसह विविध संघटनेच्या कार्यकर्त्यानी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत