प्रेम न भेटणांंर.. चूक कोणाची देव जाणे.. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्रेम न भेटणांंर.. चूक कोणाची देव जाणे..

 प्रेम न भेटणांंर.. चूक कोणाची देव जाणे...... ..म्हणतात न प्रेम आंधळ असत ... कॉलेज जीवनापासून तिच्यावर मनापासुन प्रेम केलं पण ते प्रेमाला वा...

 प्रेम न भेटणांंर.. चूक कोणाची देव जाणे......



..म्हणतात न प्रेम आंधळ असत ... कॉलेज जीवनापासून तिच्यावर मनापासुन प्रेम केलं पण ते प्रेमाला वाचा फुटली नाही. फक्त तिच्याकडे बघायचं.. फक्त झुरायच....तिच्यासाठी काय करू काय नको करू अशी त्याची अवस्था, तीच लग्न जमलेले समजलं मग हातातून सगळं गेल्यागत ..अस्वस्थ व्हायचं... पण जेव्हा बोलायची संधी होती तेव्हा प्रेमाची मागणी न केल्याचं दुःख आता भोगण्यात काय मजा... आता फक्त तिला भावी वैवाहिक वाटचालीस शुभेच्छा द्यायचा बस एवढंच...

 मनाने सुंदर असा तो तरुण कॉलेज जीवनात त्याला एक तरुणी मनमोन भावली. तिच्याशी मैत्री झाली ... परंतु त्यानंतर काही काळ जाताच एकतर्फी प्रेम जडले.. त्याला ती खूप आवडायची वाटत अस हीच आपली प्रियकर.. परंतु तीने त्यास कधीही ते लागून दिला नाही. तो जरी तिच्यावर प्रेम करत होता.. याची तिला थोडीफार तरी जाण होती.. पण तिने त्याकडे कधी लक्षही दिले नाही.

 वास्तविक तो जर खर मनापासून प्रेम करत होता तर तिला त्याने प्रपोज करून मनातील भाव सांगणं गरजेचे होत..परंतु ती नाराज होईल का, पुन्हा आपल्याशी बोलणं का याच भीतीने त्याने प्रेमरूपी विनंती केली नसावी... हे होत असताना मात्र तिचे काम असले की त्याची नक्की आठवण यायची हा पण देवाने दिलेल्या आदेशानुसार परमार्थ साधायचा...


कॉलेज जीवनातील दिवस संपले, ती नोकरी करू लागली हा ही नोकरी तथा व्यवसायाकडे वळाला... एक दिवस असा आला की अचानक सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्यचा फोटो दिसला.. तेव्हा त्याच्या काळजात धस्स झालं.. त्याला विश्वास बसत नव्हता. ती आता कोणाची तरी होणार याची जाण त्याला झाली. मनमोन दुःख झाल.परंतू चूक ही त्याची होती.. त्याने कधी प्रेम रुपी मागणी केली नाही.. आणि तिनेही त्याला मित्र म्हणूनच वागणुक दिली.


साखरपुडा झाल्यानंतर लग्न वेळ व काळ ही ठरला मग हा अजून हतबल झाला.. आता तर पूर्ण मनोमनी ठरलं ती.. माझी नाहीतर त्याची होणारं... तिने कसलं दुःख न बाळगता त्याला फोन केला.. अरे माझा साखरपुडा झाला.. आणि लग्नही ठरले.. हा बिचारा डोळ्यातून न समजणारे अश्रू व  अगदी एखाद्या कोमजलेल्या फुलाप्रमाणे संवाद साधू लागला.


लग्न जवळ येताच तिला त्याची आठवण झाली... अरे पत्रिका .. अरे..डीजे कुठं चांगला... अरे त्यांना मिरवायला घोडा भेटलं का... हा बिचारा जस घरातील लग्न म्हणून कार्यवाहकाची जबाबदारी दिल्यागत धावत होता. दरम्यान काळात ती त्याला एकदा दोनदा भेटली.. परन्तु माझं प्रेम होतं ही बोलण्याची तसदी त्याने घेतली नाही हा त्याचा भित्रेपणा म्हणावा की आणखी काय देवच जाणे.. त्याने न चुकता घरी नेऊन गडंगनेर दिलं.. साडी-चोळी ने ओटी भरली.क्षणात तो मनात पुटपुटुन गेला असावा हीच होती ग तुझी सुनबाई पण ... आता काय 


 अखेर लग्न दिनांक जवळ आली ती तिच्या लग्नाची तयारी करत होती.. हा मनाची तयारी करून लग्नात जायच तिला शुभेच्छा द्यायचा हा निर्णय घेतला.. लग्नाला मी चांगला दिसावा म्हणून स्वतःसाठी कपड्याची खरेदी.. तिला गिफ्ट घेण्यासाठी वर्ग मित्र-मैत्रीण यांना फोन करून संध्याकाळी हळदीलाच या बरका.. लग्नाला यावच लागलं...अरे गिफ्ट काय घ्यायचं आपण एकत्रित गिफ्ट देऊ यासाठी तगमग लपविता आली नाही.. तिने त्यांच्या वर्गातील मित्राना व मैत्रिणीना एवढं आग्रहाच आमंत्रण दिले नसेल पण हा घरातील लग्न समजून सर्वांना आग्रह नव्हे हट्ट करत होता... एकप्रकारे आपण लग्नात भावुक होऊ नये म्हणून सपोर्ट शोधत असावा...

हळद सायंकाळी असल्याने दुपारी मित्रांनी त्याच्याशी संवाद साधला आणि तू आताच अश्रूला वाट दे पण हतबल होऊ नको असा सल्ला दिला. पण ज्याच त्याच दुःख ज्याला त्याला माहित असतो..हे मात्र नक्की..

 असो या प्रेमात... दोष कोणाचा देव जाणे.. हा बोलला नाही अन् तिने याला विचारणा केली अथवा समजून घेतलं नाही.. तिला आता फक्त भावी वैवाहिक वाटचालीस शुभेच्छा देणं आणि यान आपली प्रगती साधून  प्रेम विवाह करणं किंवा घरच्याच्या संमतीने  विवाह करणं हा एकमेव पर्याय 

*लेखक- श्रीकांत जाधव*


(सदर कथा काल्पनिक नसून वास्तव आहे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत