लोकसेवा आघाडीवर रणशिंग फुंकण्याच्या पहिल्याच दिवशी नाराजीचा सूर ? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकसेवा आघाडीवर रणशिंग फुंकण्याच्या पहिल्याच दिवशी नाराजीचा सूर ?

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येत्या १९ जूनला देवळाली प्रवरा सोसायटीची निवडणूक होत असून सत्ताधारी भाजप तथा माजी आ.चंद्रशेखर कदम गटास सत्तेतून पायउ...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-



येत्या १९ जूनला देवळाली प्रवरा सोसायटीची निवडणूक होत असून सत्ताधारी भाजप तथा माजी आ.चंद्रशेखर कदम गटास सत्तेतून पायउतार करून परिवर्तन घडवण्याचा चंग गाठलेल्या लोकसेवा आघाडीच्या पहिल्याच मेळावा संपत नाही तोच लोकसेवा मंडळाला घरघर लागली असून या मेळाव्यास उपस्थित असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आप्पासाहेब ढुस यांनी आपली नाराजी व्यक्त करून सोशल मीडियावर विरोधी पोस्ट टाकली आहे.यामुळे आघाडीत प्रचार शुभारंभापुर्वीच बिघाडी होती की काय? या चर्चेला उधाण आले आहे.

अशिया खंडात नावाजलेली राजकिय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या देवळाली प्रवरा सोसायटीत सध्या भाजप तथा माजी आ.चंद्रशेखर कदम गटाची सत्ता आहे.काही झाले तरी कदमांना सत्ता मिळून द्यायची नाही आणि परिवर्तन घडवून आणायचे असा चंग बांधून राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना व इतर स्थानिक नेत्यांनी लोकसेवा मंडळ स्थापन केली आहे.निवडणूक जशी जशी तोंडावर येत आहे तश्या तश्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे.भाजप तथा कदम गटाने आपल्या काही उमेदवारांचे अर्जही दाखल केले तर दुसरीकडे लोकसेवा मंडळाने बाजारातळावर मेळावा घेऊन हम सब एक है चा नारा बाजार तळावर रविवारी दिला. त्यानिमित्ताने हा मेळावा पार पडला या मेळाव्यात मानअपमान नाट्य प्रकर्षाने दिसून आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांना व्यासपीठावर डावलले नाईलाजास्थाव उपस्थित्यांमधील खुर्चीवर बसावे लागले.मेळावा संपत नाही तोच प्रहारचे आप्पासाहेब ढुस यांनी आपली नाराजी मनात न ठेवता सोशल मिडियाच्या माध्यमातून जनता तथा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचवली ढुस यांनी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्ट मध्ये म्हटले की,ढुस, शेटे, पठारे, कडू आदिंसह इतर जथे व पक्ष यांना डावलून देवळाली प्रवरा सोसायटीत परिवर्तन अशक्य..!  परिवर्तन हवे असेल सर्वांना सोबत घ्या..! अन्यथा,पुन्हा येरे माझ्या मागल्या.! असे नमूद केले आहे.ही पोस्ट व्हायरल होताच एकच गोंधळ उडाला आणि आपसुख कदम समर्थकांत आघाडीत पहिल्याच दिवशी बिघाडी झाल्याची खमंग चर्चा सुरू झाली.दरम्यान आप्पासाहेब ढुस हे मेळावा संपत नाही तोच आपली जाहीर नाराजी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केल्याने देवळाली प्रवरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.अद्याप अर्ज दाखल होण्यासाठी आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने काय काय राजकीय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


म्हणून आप्पासाहेब ढुस यांना टाळले का?

देवळाली प्रवरा सोसायटीत 2011 मध्ये सत्तांतर झाले. यानिवडणूकीत आताचे विरोधक यांनी ढुस यांच्या मातोश्री चांगुणाबाई ढुस यांना उमेदवारी देवून निवडून आणले होते.केवळ त्यांच्या मातोश्रीस चेअरमन अथवा व्हा.चेअरमन न केल्यामुळे ढुस यांनी सत्ताधाऱ्यासह विरोधकांना  सहकार निबंधक, सहकार आयुक्त, सहकार न्यायालयात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन तक्रार करुन खेचले होते. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून दिला होता.सहकार निबंधक ते सहकार न्यायालय या सर्वांनी चौकशी अहवाल व सहकार न्यालयात युक्तीवादात हा भ्रष्टाचार नसुन  हि अनियमता आहे. असा निर्णय दिला असल्याचे समजते. याच तक्रारीवरुन ढुस ज्या मंडळातुन निवडून आले त्या मंडळाच्या  विरोधात तक्रार केल्यामुळे त्यावेळचे सत्ताधारी व विरोधक संताप व्यक्त करीत आहे. राजकारणात विरोधकांवर टिका व तक्रार करायची असते मात्र सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे झाकून ठेवून झाकली मुठ सव्वालाखाची ठेवायची असते. परंतू 2011 च्या निवडणूकीत वेगळेच घडले त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही मंडळाचा विश्वास नसल्याचे मंडळाचे प्रमुख कार्यकर्त्यांसह सभासद बोलून दाखवत आहे. 2011 ची चुक आजच्या निवडणूकीत त्यांना आडवी येते का म्हणून ढुस यांना टाळले असावी चर्चा सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत