तेली समाजाने देशाला पंतप्रधान मोदी सारखे नेतृत्व दिले- रमेश पन्हाळे. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

तेली समाजाने देशाला पंतप्रधान मोदी सारखे नेतृत्व दिले- रमेश पन्हाळे.

सात्रळ(वेबटीम) शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तेली समाजाचा भव्य वधू-वर पालक परिचय मेळावा शिर्डी ला.प्रचंड मोठा प्रतिसाद व गर...

सात्रळ(वेबटीम)


शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तेली समाजाचा भव्य वधू-वर पालक परिचय मेळावा शिर्डी ला.प्रचंड मोठा प्रतिसाद व गर्दी बघावयास मिळाली. 




उत्कृष नियोजन व आयोजन यामुळे मेळावा सर्वांच्या पसंतीस आला मेळाव्याची खास वशिष्ठ होते ते 101 रुपयात नोंदणी व विना जाहिरातीचे वधू वर माहिती पुस्तक  प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएस्ट तर्फे विविध पुरस्कार वितरण सोहळा व वधू वर मेळावा उत्साहात झाला. सामाजिक क्षेत्रात व कोरोना काळात उत्कृष्ट काम केलेल्या अन्य समाजातील मान्यवरांचाही गौरव यावेळी करण्यात आला. शिर्डी येथील श्री साईबाबा पालखी निवारा येथील कै. काकासाहेब वाकचौरे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रमेश शेठ पन्हाळे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक कार्यकर्ते रमेश शेठ पन्हाळे यांनी आपल्या भाषणात. समाजाने या देशाला आदरणीय पंतप्रधान मोदीजी सारखे नेतृत्व दिले, आजही माननीय चंद्रशेखर बावनकुळे, जय दत्ता अण्णा श्रीरसागर, विजय वडीवट्टीवार यांनी राजकीय क्षेत्रात प्रभावी  कर्तुत्वाचा ठसा उमटवला आहे. समाजाची जे भव्यदिव्य वधू वर मेळावे आयोजित करण्यात येतात ते एका दिवशी होणार नाहीत याची काळजी घ्यावी, समाजाचे 28 पोटजाती आहेत यामध्ये जुन्या रुढी ना फाटा देऊन विवाह संबंध व्हायला मेळाव्यात पुढाकार घेतला पाहिजेत, अत्यंत काटकसरीने नियोजन केल्यास देणग्या, जाहिराती न घेता सुंदर व आकर्षक नियोजन करून मेळावा करणे शक्य आहे ही आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राला दाखवण्याचे काम साईबाबाच्या पुण्यभूमीत बाबांच्या आशीर्वादाने शक्य झाल्याचे दिसून येत असे नमूद केले. 


याप्रसंगी श्री भारत शेठ.चवरो, श्री भारत साळुंखे, श्री सुधाकर बनसोडे, श्री सुरेश नागले, सौ पुष्पा चौधरी, सौ प्रीती चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचे  उदघाटन   श्री रमेश जी पन्हाळे यांच्या हस्ते  करण्यात आले. श्री साईबाबा सेवा रत्न पुरस्कार 2022 विद्याताई रतन चौधरी राहता, डॉक्टर स्वप्निल स्वप्निल माने राहुरी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट शिर्डी, श्री भारत शेठ चवरे मुंबई, श्री भारत साळुंखे बेलापूर, श्री साई पालखी निवारा निघोज ट्रस्ट शिर्डी यांना देण्यात आला, तर श्री संताजी महाराज जगनाडे समाज रत्न पुरस्कार 2022 हा संगमनेर येथील डॉक्टर अमोल वालझडे यांना वैद्यकीय सेवा पुरस्कार तर श्री जनार्दन वालझडे शिबालापूर यांना समाजकारण साठी तसेच दाढ तेली समाज राहता तालुका, तिळवण तेली समाज ट्रस्ट अहमदनगर, श्री जगन्नाथ लुटे शिर्डी यांना समाज सेवेसाठी  प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष ऍड.  श्री  विक्रांत वाकचौरे यांनी केली. प्रारंभी  पुष्पा चौधरी, श्री प्रकाश सैनदर , मेळावा समितीचे श्री बद्रीनाथ लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.  समाजाच्या  महिला  कार्यकर्त्या सौ रंजना शिंदे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी,) सौ तारकेश्वर वालझडे ,सौ रीना वालझडे, वैशाली देशमाने, सौ पुष्पा चौधरी, सौ प्रीती चौधरी यांचाही याप्रसंगी  सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  राकेश रायसोन यांनी उत्तमरीत्या  पार पडले.  कार्यक्रमाचे आभार श्री संजय बागुल यांनी मानले,  यावेळी ट्रस्टचे सचिव श्री सचिन लोखंडे, श्री अमित महाले, श्री गणेश वाकचौरे, श्री यशवंतराव वाकचौरे, श्री अनिल बनसोडे, श्री नामदेव वाकचौरे, श्री विक्रम लुटे, श्री रतन चौधरी, श्री दीपक चौधरी, श्री मुकुंद बनसोडे, श्री प्रसाद शिंदे, श्री सागर काळे, श्री निलेश दुर्गुडे, निलेश काळे, सौ आशा राऊत, सौ हर्षदा वाकचौरे, सौ रोहिणी लोखंडे, सौ आणि लुटे, श्री राकेश, सौ.रंजना बागुल, सौ गायत्री चौधरी, श्री दिलीप राऊत, सौ सीमा मगर, सौ नयन पन्हाळे, आधी समाज बांधव व  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत