शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी निषेधार्थ गुरुवारी श्रीरामपूरकरात सर्व पक्षीय निषेध - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी निषेधार्थ गुरुवारी श्रीरामपूरकरात सर्व पक्षीय निषेध

श्रीरामपूर(प्रतिनिधी)   श्रीरामपूर ऐवजी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या निर्णयावर श...

श्रीरामपूर(प्रतिनिधी)



  श्रीरामपूर ऐवजी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या निर्णयावर श्रीरामपूरकरांचे भावना लक्षात घेऊन शासनाने फेर विचार करावा, यासाठी आज गुरुवार (१५) ला सकाळी १०.३० वाजता मेनरोडवरील महात्मा गांधी पुतळ्याला हार घालून निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व पक्षाचे प्रतिनिंधीनीं यावे असे आवाहन सामाजिक भावनेतून श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी केले आहे. 

श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती आयोजित सर्व पक्षीय मेळाव्यात राजेंद्र लांडगे बोलत होते.मेळाव्याचे अध्यक्षस्थानी अण्णासाहेब डावखर होते. जनहिताचा विचार करून शासनाने शिर्डी ऐवजी श्रीरामपूरातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय करावे. खरंतर शासनाने आधी विभाजन, नंतर नामांतर करणे अपेक्षित होते. मात्र रात्रीतून नामांतर करून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत मंजूर करून जिल्हा विभाजनाचा गुंता पुन्हा वाढवला आहे. ४२ वर्षापासून श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे.

श्रीरामपूरकरांनी आतातरी लोकसहभागातुन तीव्र निषेध नोंदवावा. यावेळी सर्व पक्षीय आजी माजी लोकप्रतिनिधींनी देखील जाहिर निषेध करावा. शहरातील व्यापारी उद्योजक वकिल डॉक्टर विविध सामाजिक संघटना कलाकारांनी देखील मोठया प्रमाणात सहभागी व्हावे. अन्यथा शहरासह तालुक्याची अर्थ व्यवस्था पूर्णतः मोडकळीस येईल. नव्याने कोणताच विकास होणार नाही. उद्योग धंदे अक्षरशः अडचणीत येतील. पर्यायाने बाजारपेठ उध्वस्त होईल. आणखीन विदारक स्थिती निर्माण होईल.श्रीरामपूरसह नेवासा राहुरी तालुक्यातील युवापिढी देशोधडीला लागतील यासाठी निषेध करण्यासाठी यावे असे लांडगे म्हणाले आहे.

याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे क्षेत्र आहे. तेथे राज्यासह देश-विदेशातून भक्तगण गर्दी करतात. वर्षभर सण उत्सव चालूच असतात. त्यातच वारंवार राज्य आणि केंद्रीय मंत्रीमंडळ सदस्यांची नेहमीच वर्दळ असते.यामुळे प्रशासनाची नेहमीच धांदल उडते. त्यातच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत झाल्यास सर्वसामान्य जनतेकडं लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ मिळणार नाही.याकरिता जिल्ह्याचे ठिकाण म्हणून श्रीरामपूरच योग्य आहे. निळवंडेचे पाणी भविष्यात कपात झालेवर शेती व्यवसाय धोक्यात येईल. नवनवीन उद्योजक औदयोगिक वसाहतीत येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असेही भाऊसाहेब कांबळे म्हणाले आहे.

ऍड.सुभाष जंगले म्हणाले कि, श्रीरामपूर राहुरी नेवासा तालुक्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी

नेते कार्यकर्ते सरपंच विविध कार्यकारी सोसायटी पतसंस्था मल्टीस्टेट विविध सामाजिक संघटना सर्व व्यापारी संघटना असोसिएशन सर्व उद्योजक सर्व धर्मीय उत्सव मंडळ सर्व पेन्शनर्स संघटना प्रतिनींधीनीं मोठ्या प्रमाणात ठराव अथवा पाठिंबा पत्र देऊन लोकसहभाग नोंदवावा असेहि आवाहन जंगले यांनी केले.

 या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे सचिन बडधे शिवसेना शिंदे गट प्रसिद्धी प्रमुख शामभाऊ गोसावी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष युवराज जगताप समिती कार्याध्यक्ष अनंत निकम उपाध्यक्ष इंजि.चंद्रकांत परदेशी कुणाल करंडे सचिव नानासाहेब तुपे आध्यत्मिक आघाडी समन्वयक हभप दत्तात्रय बहिरट कडूसकर सर शेखर दुबय्या देविदास चव्हाण विजय काळे प्रवीण झवर आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी नुकत्याच दहावी तालुक्यात पहिली आलेली सायली साळुंके द्वितीय सोहम बडाख तृतीय बालाजी बोर्डे विजय तेवर यांचा गुणगौरव करण्यात आला. 

 सर्व पक्षीय मेळावा यशस्वी होण्यासाठी अभिजित बोर्डे, दिपक पुरी, जयेश सावंत, युवा समन्वयक सागर भांड, किशोर झिंजाड मनोज हासे, सुनील सुतावणे, सुनील शेळके अनिल सावंत, विजय शिंदे, राजाराम शिंदे अशोक कर्णे, जानराव सर , सोमनाथ परदेशी ज्ञानेश्वर गुलदगड, रवींद्र आमले, राजेंद्र गोरे संदीप गायधने, बबनराव उघडे, अण्णासाहेब ठोकळ, अनिल सावंत, दिपक थोरात आदींनीं परिश्रम घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत