राहूरी (प्रतिनिधी):- राहुरी येथील महसूल विभागात कार्यरत असलेले मंडलाधिकारी दत्तात्रय गोसावी यांच्या कामकाजाची व मालमत्तेची चौकशी करून त्यांच...
राहूरी (प्रतिनिधी):-
राहुरी येथील महसूल विभागात कार्यरत असलेले मंडलाधिकारी दत्तात्रय गोसावी यांच्या कामकाजाची व मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशी तक्रार सतिष फुलसौंदर यांनी लाचलुचपत विभाग, अहमदनगर येथील पोलीस उप अधिक्षक यांच्याकडे केली आहे.
सतिष भाऊसाहेब फुलसौंदर, रा. राहुरी यांनी केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे कि, राहुरी येथील मंडलाधिकारी दत्तात्रय रामगिरी गोसावी हे राहुरी तहसिलमध्ये वांबोरी मंडलाधिकारी म्हणुन कार्यरत आहे. या मंडलामध्ये मोठया प्रमाणात खडी क्रेशर, अवैध मुरुम उत्खनन, तसेच चोरटी वाळू वाहतुक मोठया प्रमाणात होत आहे.
तसेच आपल्या नातेवाईकांच्या नांवे गाडी, बंगले, जमिनी घेतल्या आहेत. हा मंडलाधिकारी अतिशय मुजोर असून मला राजकीय वरदहस्त आहे. माझे कोणीच काहीकरु शकत नाही. अशी वल्गना करत असतो. तथापी या मंडलाधिका-याच्या राहुरी तहसिलमधील कार्यकाळ संपलेला असुन वरिष्ठांना पैसे वाटुन व राजकीय दबाब टाकुन माझी राहुरीतुन कोणीही बदली करु शकत नाही असे वारंवार बोलत असतो.
तसेच दत्ता गोसावी काम करत असलेल्या मंडळामध्ये २३ जुलै २०२२ रोजी मौजे डिग्रस येथे नेवासा येथील जिल्हा गौण खनिज पथकाने सुमारे ९५ ब्रास बेकायदेशिर वाळू साठा जप्त केला होता. यावरुन या मंडलाधिकारी दत्ता गोसावी याची निष्क्रियता तसेच वाळू तस्करांशी असलेले आर्थिक हितसंबंध दिसुन येतात. त्या वेळी तत्कालीन मंडलाधिकारी दत्ता गोसावी यांच्यावर कारवाई झाली नाही.
शासनाची फसवणुक करणा-या व महसुल बुडविणा-या या मंडलाधि-याची खातेनिहाय चौकशी होऊन चोरी गेलेला वाळु, मुरुम, व इतर गौण खनिज याची वसुली त्यांच्या पगारातुन व्हावी. त्यांची बदली या तालुक्यातुन करुन चौकशी करुन निलंबीत करावे. अन्यथा १०जुन २०२३ रोजी राहुरी तहसिलसमोर आमरण उपोषण करणार असे सतिष फुलसौंदर यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत