राहुरी/वेबटीम:- नांदेड जिल्ह्यातील बोठार हवेली येथे अक्षय भालेराव या दलित युवकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याच...
राहुरी/वेबटीम:-
नांदेड जिल्ह्यातील बोठार हवेली येथे अक्षय भालेराव या दलित युवकाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करून आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आरपीआय आंबेडकर पक्षाच्या वतीने पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या ठिकाणी अक्षय भालेराव या तरूणाने पुढाकार घेऊन गावात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. त्यामुळे जातीयवादी लोकांच्या मनात पोटशूळ उठला व त्यातूनच अक्षय भालेराव या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपींना अटक करावी अशी मागणी राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांनी केली.
अन्यथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत दारोळे,जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हा महासचिव आतिष मकासरे,सुरज मकासरे, नितीन भांबळ, प्रमोद मकासरे,समीर शेख, आमिर शेख आदिंसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत