केसापूर व दवणगाव येथे चोरट्यांचा डाळिंबावर डल्ला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

केसापूर व दवणगाव येथे चोरट्यांचा डाळिंबावर डल्ला

आंबी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील केसापूर दवणगाव येथील शेतकऱ्यांची दाळींबाची चोरी होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभ...

आंबी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील केसापूर दवणगाव येथील शेतकऱ्यांची दाळींबाची चोरी होऊन लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

   केसापूर येथील सरपंच बाबासाहेब पवार यांच्या गट नं ३४ मधील शेतातील ऐन तयार होऊन काढणीला आलेले डाळींब  अज्ञात चोरट्याने मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन 

 चोरुन नेल्याने पवार यांचे अंदाजे सहा लाखाचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत दवणगाव येथील उपसरपंच भरत होन यांच्या शेतातील डाळींब चोरीस गेले आहे. रात्री बिबट्याच्या भितीने शेतकरी बागाचे राखण करण्यास धजत नसल्याने चोरट्यांनी या संधीचा फायदा घेऊन डाळींब चोरीचा सपाटा या भागात लावला आहे. या भागात भुरट्या चोर्‍याचे सत्र चालूच आहे. 

तरी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभा केलेल्या डाळींबाच्या बागेची राखण करावी असे सरपंच बाबासाहेब पवार यांनी सांगितले. कमी पाऊस, वाढती महागाई, रोगराई अशा वाईट प्रसंगी  शासनाने व पोलीस खात्याने  सुद्धा शेतकर्यांच्या पाठीशी ऊभे राहणे गरजेचे आहे. तसेच पोलिस प्रशासनाने नदी काठावरील गावांमध्ये गस्त वाढवावी अशी मागणी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष गोरक्षनाथ पवार, दवणगावचे सरपंच मेजर भाऊसाहेब खपके यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत