दूध भेसळ रोखून दूध अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गायींचे टॅगिंग करावे; राहुरीला आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार - खा.डॉ. सुजय विखे पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दूध भेसळ रोखून दूध अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी गायींचे टॅगिंग करावे; राहुरीला आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार - खा.डॉ. सुजय विखे पाटील

राहुरी(प्रतिनिधी)  दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या असून दूधाचे अनुदान मिळण्यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच...

राहुरी(प्रतिनिधी)



 दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या असून दूधाचे अनुदान मिळण्यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे टॅगिंग करून अँप डाउनलोड करून घ्यावे. राहुरी तालुक्यातील जिरायत भागाला आता निळवंडे धरणाचे पाणी मिळणार आहे हा व अयोध्येतील श्रीराम मंदिर हा आमच्या दृष्टीने ऐतिहासिक क्षण असल्याने दोन्ही प्रसंग हे दिवाळी सणा प्रमाणे साजरे करावेत असे प्रतिपादन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

          राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे, गणेगाव, वडनेर, कानडगाव, निंभेरे, तुळापूर, तांदुळनेर आदी ठिकाणी खा.डॉ.सुजय विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत साखर वाटप करण्यात आली तसेच निळवंडे धरण कालव्यांच्या कामाची पाहणी केली यावेळी खा.डॉ.सुजय विखे पाटील बोलत होते.

       खा.डॉ.विखे म्हणाले की, राज्यात आता सामान्य शेतकऱ्यांना दूध अनुदान मिळावे म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दूध भेसळ रोखण्यासाठी उपाय योजना केल्या असून शेतकऱ्यांनी जनावरांचे टॅगिंग करून घ्यावे. खाजगी दूध संकलन केंद्र व सहकारी दुध संस्था  शेतकऱ्यांना अनुदान देत नाहीत त्यामुळे आता हा चांगला पर्याय आहे. राहुरी तालुक्यातील या जिरायत भागाला निळवंडे धरण कालव्यांतून पाणी मिळावे यासाठी विखे पाटील परिवाराने कायम शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला निळवंडे धरण कालव्यांच्या कामाचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. त्यामुळे निळवंडे व अयोध्या येथील श्रीराम मंदिर हे दोन क्षण महत्वाचे असल्याने हे दोन्ही दिवस दिवाळी म्हणून साजरे करावेत. आपली सत्ता आल्यानंतर या परिसरातील अनेक विकास कामे मार्गी लागले आहेत.

       माजी आ.कर्डिले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ता असताना विकास कामे करता आले नाहीत. फक्त विरोधी माणसाला त्रास देण्याचे काम झाले. त्यातून काहींना पक्षात येण्यासाठी हतबल केले. आमच्या साखर वाटपाला हत्तीवरून साखर वाटा अशी टीका करता मग आपणही कारखानदार आहात, आपणही असा उपक्रम राबवा पण सामान्य माणसाच्या भावना यांना कधी समजत नाहीत अशी टीका केली.

         यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, चांगदेव भोंगळ, माजी अध्यक्ष नानासाहेब गागरे, सर्जेराव घाडगे, सरपंच शोभाताई भनगडे, सोपान गागरे, विकास कोबरणे, मारुती नालकर, संदीप गिते, भिमराज हारदे, आण्णासाहेब बलमे, बापूसाहेब मुसमाडे, शांताराम सिनारे, संदीप घाडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गावच्या विकासासाठी एक रुपया दिला नाही, आता आमच्यावर टीका करता का?- भनगडे

राहुरी तालुक्यातील गणेगाव या छोट्या गावासाठी खा.डॉ.विखे व माजी आ.कर्डिले यांनी भरभरून निधी दिला. मात्र गावातील एका घटनेच्या अनुषंगाने सत्तेच्या माध्यमातून हतबल केल्याने मला त्यावेळी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करावा लागला होता. परंतु त्यांच्या आताच्या टिकेला अर्थ नाही कारण त्यांनी गावासाठी एक रुपया निधी दिला नाही. श्रेय घेण्यासाठी आमच्यावर टीका केली जाते असा खुलासा यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत