श्रीरामपूर (प्रतिनिधी) बावीस नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी शासन विचारधीन आहे. प्रभू श्रीरामाचे वास्तव्याने श्रीरामपूर नजीक गोदाकाठ परिसर पु...
श्रीरामपूर (प्रतिनिधी)
बावीस नवीन जिल्हे निर्माण करण्यासाठी शासन विचारधीन आहे. प्रभू श्रीरामाचे वास्तव्याने श्रीरामपूर नजीक गोदाकाठ परिसर पुनीत झालेला आहे. नुकत्याच अयोध्या प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठामुळे आनंदाचे वातावरण आहे. योगायोगाने उद्यापासून राज्य विधीमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात शासनाने तशी आर्थिक तरतूद करावी.तसेच येत्या श्रीराम नवमी निमित्ताने प्रभू श्रीरामचंद्रांचे नावाने असलेला एकमेव श्रीरामपूर जिल्हा निकषाचे आधारे होण्यासाठी आमदार लहुजी कानडे यांनी प्रश्न मांडण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती व पसायदान प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी निवेदन दिले आहे.
अशोकनगर फाटा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आ. लहुजी कानडे यांची राजेंद्र लांडगे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या राज्य विधिमंडळाचे अर्थ संकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महसूलमंत्री यांनाही भेटणार आहोत. या अधिवेशनात तरी शासन जिल्हा विभाजन विधेयक निश्चितच एकमताने मंजूर करेल याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. श्रीरामपूर जिल्हा झाल्यास नवनवीन उद्योग धंदे वाढीस मदत होईल. शिवाय सर्व सामान्य नागरिकांचे क्रयशक्तीत वाढ होणार आहे. येत्या श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा जाहिर झाल्यास तो ऐतिहासिक निर्णय होईल.
खरंतर श्रीरामपूर जिल्हा हा प्रतिष्ठेचा आणि भावनिक होत चालला आहे.साठ हजार वर्ष अहिल्या शिळा होऊन पडली होती. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या शाप मुक्त झाली. तसे देशातील प्रभू श्रीरामाच्या नावाने पावन झालेले एकमेव श्रीरामपूर शहर शाप मुक्त होण्यासाठी संघर्ष समितीने तीन महिन्यापूर्वी श्रीरामालाच साकडे घातले. त्याच बरोबर अयोध्या प्रभु श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठे निमित्तानेहि
पहिल्या टप्प्यात २२,२२२ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने दुसऱ्या टप्प्यात १९,११९ वेळेस श्रीराम तारक मंत्र नामजपाने श्रीरामपूर जिल्हा होण्यास अनुकूलता निर्माण होत आहे. प्रभू श्रीरामात श्रीरामपूर जिल्हा करण्याची अदृश्य शक्ती आहे यावर आपला विश्वास आहे.
येत्या १७ एप्रिलला होणाऱ्या श्रीराम नवमी निमित्ताने श्रीरामपूर जिल्हा शंभर टक्के होईल असा विश्वास राजेंद्र लांडगे यांनी शेवटी बोलून दाखविला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत