राहुरी/वेबटीम:- मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात धरणात होत असून धरण २० टी.एम.सी...
राहुरी/वेबटीम:-
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात धरणात होत असून धरण २० टी.एम.सी. पेक्षा जास्त भरले आहे. मुळा धरणातून आपण जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याअगोदर मुळा डावा व उजवा कालव्यात पाणी सोडावे अशी मागणी पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केली.
मुळा धरण हे आज रोजी २० टी.एम.सी. पेक्षा जास्त भरले आहे, परंतु मुळा डावा व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अजून पुरसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतामध्ये उभे असणारे पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत तसेच पिकांसाठी व जनावरांसाठी पाण्याची कमतरता भासत आहे. ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी आपण जायकवाडी धरणात पाणी सोडण्यापूर्वी मुळा डावा व उजवा कालव्यात पाणी सोडावे, जेणेकरून कालव्याच्या लाभक्षेत्राखालील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि विहिरी व बोअरवेल चे पाणी वाढण्यास मदत होईल असे निवेदन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मा. लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत