श्रीरामपूर(वेबटीम) लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर मध्ये महामानव विचार प्रबोधन समिती व विविध...
श्रीरामपूर(वेबटीम)
लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर मध्ये महामानव विचार प्रबोधन समिती व विविध सामाजिक संघटनांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीत कर्मचारी संघाचे राज्य प्रदेशाध्यक्ष रमेश मकासरे यांनी अभिवादन पर मनोगत व्यक्त करताना सांगितले की छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानात पहिल्यांदा आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाची अंमलबजावणी केली. बहुजन समाजाला सक्तीचे आणि मोफत शिक्षण सुरू केले. सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी व न्याय असणारे राज्य चालवण्याचं काम छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केले. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा असे बहुजन समाजाला आवाहान केले होते.
यावेळी बामसेफचे ज्येष्ठ कार्यकर्ते एस. के. चौदंते, दत्तनगरचे माजी सरपंच पी. एस. निकम, लोकवेधचे संचालक अशोकराव जाधव, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे तालुकाध्यक्ष सलीम शेख, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे, मुळा-प्रवराचे माजी संचालक अशोक बागुल, बापू वैराळ, सुधाकर बागुल, तुकाराम धनवडे, सी. एस. बनकर, भारत पगारे, शांताराम बोर्डे, प्रकाश सावंत, एल. एन. म्हस्के, फ्रान्सिस शेळके, भाऊसाहेब हिवराळे, दिनकर मोरे, भाऊसाहेब खरात, अंतोन भरपूरे, के. सी. दाभाडे, लक्ष्मण मोहन, कचरू साबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत