अहिल्यानगर मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून मुळा उजवा कालवा, मुळा डावा कालवा तसेच वांबोरी चारी टप्पा क...
अहिल्यानगर
मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून मुळा उजवा कालवा, मुळा डावा कालवा तसेच वांबोरी चारी टप्पा क्रमांक एकला उद्यापासून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पिकांना मोठा आधार मिळणार असून पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुळा धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पाणी मिळावे, यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अक्षय कर्डिले यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत संबंधित यंत्रणेशी चर्चा करून कालव्यांना पाणी सोडण्याबाबत प्रयत्न करण्यात आले. अखेर या प्रयत्नांना यश आले असून उद्यापासून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुळा उजवा कालवा आणि मुळा डावा कालव्याच्या माध्यमातून अनेक गावांतील शेतीला पाणीपुरवठा होतो. याशिवाय वांबोरी चारी टप्पा क्रमांक एकलाही पाणी मिळणार असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या खरीप हंगामातील पिकांसाठी पाण्याची गरज वाढलेली असताना कालव्यांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना संजीवनी मिळणार आहे.पावसाच्या लहरीपणामुळे काही भागात पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत कालव्यांना पाणी सोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. पाण्यामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळण्याबरोबरच विहिरी आणि अन्य जलस्रोतांनाही काही प्रमाणात आधार मिळण्याची अपेक्षा आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून लाभक्षेत्रातील शेतीला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमदार अक्षय कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून कालव्यांना पाणी मिळत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, कालव्यांना पाणी सोडण्यात आल्यानंतर संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या आवर्तनामुळे मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुळा कालव्याच्या पाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अक्षय कर्डिले यांचे शेतकरी वर्गातून आभार मानले जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत