कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यामागे कोपरगाव शहराचा विकास व्हावा हि एकमेव भूमिका होती. ती भूमिका त्यावेळीही होती व यापुढेही कायम असून त्या माध्यमातून कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जिल्हा नियोजनमधून विकासकामांसाठी २ कोटी रुपये व कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी रुपये निधी आणला. कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी शासनदरबारी ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आपण खंबीरपणे उभे राहून निधी आणू असे आश्वासन देवून लवकरच कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांची कामे सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे देखील शहर विकासाच्या प्रश्नाबरोबरच पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य आदी प्रश्नासह नागरिकांचे सर्वच मुलभूत प्रश्न सोडवून कोपरगाव शहराला जोडलेल्या ग्रामीण भागाचा देखील विकास करू अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलतांना नगराध्यक्ष विजयराव वहाडणे म्हणाले की, नगराध्यक्ष झाल्यापासून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. शहराचा विकास करतांना आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पक्षाचे नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. मात्र मागील पाच वर्षात माजी आमदारांनी विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही व त्यांचे नगरसेवक देखील त्यांचाच कित्ता गिरवत असून विकास कामांना विरोध करीत आहे. यदाकदाचित त्यांनी सहकार्य केले असते तर आज कोपरगावचा चेहरा मोहरा बदलला असता अशी टीका माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली. विकास कामांच्या उदघाटन फलकावर प्रत्येक वेळी मी सर्व नगरसेवकांचे नावे टाकले मात्र मागील पाच वर्षात नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मला न बोलविता माजी आमदारांनी गुपचूप केले यावरून राजकारण कोण करतं हे दिसून येते. ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल राजकारण करावे यापुढे आमदार आशुतोष काळेंच्या मदतीने आपण कोपरगाव शहराचा विकास करणार आहे. ज्या माजी आमदारांना वर्षात पाच नंबर साठवण तलावाचे काम करता आले नाही तेच काम आमदार आशुतोष काळे यांनी निवडून येताच तीन महिन्यातच प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून हा जिव्हाळ्याच्या प्रश्न हाती घेतला आहे. पाच नंबर साठवण तलावाचे पुढील कामासाठी देखील ते निधी आणून वर्षानुवर्षापासून रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास व्यक्त केला.
फक्त उदघाटन करायची घाई असणाऱ्या कोल्हेच्या नगरसेवकांकडे साचलेलं गटार स्वच्छ करायची मानसिकता नाही. गेल्या चार वर्षात त्यांनी प्रभागात ढुंकून देखील पाहिले नाही. त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाची १५ दिवसातच खडी उघडी पडली यावरून त्यांनी केलेल्या विकास कामाचा दर्जा काय आहे हे स्पष्ट होत असून मागील पाच वर्षात त्यांच्या नेत्यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणला असता तर कोपरगाव शहर चकाचक झाले असते. मात्र त्यांचा राजकारण एके राजकारण एवढाच अजेडा अजून कोल्हे म्हणजे भाजपच्या विराट वृक्षावर आलेलं बांडगूळाचं रोपट आहे. –प्रा.सुभाष शिंदे
यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी सरलादीदी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, गटनेते नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, सौ. प्रतिभाताई शिलेदार, श्रीम. वर्षाताई गंगूले, सौ. माधवीताई वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, , डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. तुषार गलांडे, वकील सेल अध्यक्ष ऍड. विद्यासागर शिंदे, विद्यार्थी शहराध्यक्ष स्वप्नील पवार, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष जावेदभाई शेख, ओबीसी सेल अध्यक्ष राहुल देवळालीकर, सोशल मीडिया सेल अध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के, सामाजिक न्याय सेल अध्यक्ष रावसाहेब साठे, माजी नगरसेवक फकिरमामु कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, कृष्णा आढाव, प्रशांत वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत