कोपरगाव प्रतिनिधी कोपरगाव शहरात पाणी प्रश्न गंभीर असुन अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलबिंत आहे.शहरात चार,तर कधी आठ पंधरा दिवसाआड पाणी मिळत...
कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव शहरात पाणी प्रश्न गंभीर असुन अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलबिंत आहे.शहरात चार,तर कधी आठ पंधरा दिवसाआड पाणी मिळत असते. दसरा असो
दिवाळी असो सण वारालाही पाणी चार, आठ तर कधी पंधरा दिवसाआड मिळते.यामुळे महिलांना खुप त्रास होतो. अनेक महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. नातेवाईक पाहुणे आल्यावर पाणी खुप जपून वापरावे लागते.पाण्यासाठी भटकंती करावी लागते.अनेक वेळा वापरण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते.पिण्याचे पाणी शहरातील ७० टक्के नागरिक विकत घेत आहे.कारण गाळ मिश्रित पाणी अनेक ठिकाणी नळाला येते.त्यामुळे विकत जारच्या स्वरूपात पाणी घ्यावे लागते.नुकतेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी पाणी प्रश्न संदर्भात डिजिटल आंदोलन छेडले आहे.
या आंदोलनास शहरातील नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.तसेच शहरातील महिलाही आता पुढे आल्या असुन या आंदोलनास पाठिंबा देत आहे.शहरातील रश्मी जोशी यांनी पुढा
कार घेवुन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
त्यांच्या बरोबर सौ सारिका पवार, सौ सपना हलवाई, सौ आनिता पवार, सौ पुजा दुसाने सौ सारिका भोकरे, सुप्रिया ताई निळेकर ,,सौ रुपाली वरोडे ,सौ भावना ताई कवडे, समिना बेग , सौ ज्योती हांडे, सौ शशिकला वाणी, आदि महिलांनी पाठिंबा दिला आहे.शहरातील पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा कारण महिला वर्गाला खुप त्रास सहन करावा लागतो.अशा प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केल्या आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत