राहूरी फॅक्टरी(वेबटीम) राहूरी फॅक्टरी येथे डॉ.तनपुरे साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. यावेळी खा.सुजय...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम)
राहूरी फॅक्टरी येथे डॉ.तनपुरे साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली.
यावेळी खा.सुजय दादा विखे, चेअरमन नामदेवराव ढोकणे, व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस, कार्यकारी संचालक बी.एन. सरोदे ,सर्व संचालक, अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते.
सुजय विखे यांच्या भाषणातील मुद्दे
* महाराष्ट्रात मागील ३ वर्षात २५ सहकारी साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेतले. महाराष्ट्रात कोणी असो जो पर्यंत सुजय विखे जिवंत आहे तो पर्यंत राहुरीचे खासगीकरण होऊ देणार नाही
* तनपुरे कारखान्याचे एप्रिल अखेर पर्यंत ऊस गाळप सुरू राहणार
*ज्यांच राहूरी कारखान्याला उसाच टिपरु जात नाही, त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार नाही.
* यंदाचे गाळपास अनेक अडचणी आल्या परंतु सभासद, संचालक , अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतल्यामुळे २ लाख टन ऊस गाळप आजअखेर पूर्ण
ऑनलाइन मीटिंग मध्ये सभासद बांधवानी प्रश्न विचारले त्यावर खा.सुजय विखे यांनी त्यांना उत्तरे दिली. ऑनलाइन मीटिंग मध्ये तनपुरे कारखाना संचालक मंडळ व सुजय विखे यांच्यावर टीका करणारे अमृत धुमाळही हजर होते. कोण आहेत ते, चष्मावाले कोण आहेत, मी त्यांना ओळखत नाही, बोलायच का तुम्हाला अशी विचारणा खा.विखे यांनी केली. बऱ्याच वेळ वाट ही पाहिली परंतु अमृत धुमाळ एक शब्दही बोलले नाही. त्यानंतर सुजय विखे यांचे भाषण सुरू झाले. मात्र ऑनलाईन स्क्रीनवर अमृत धुमाळ परत दिसूनही आले नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत