राहूरी फॅक्टरी (वेबटीम) येथील तनपुरे कारखाना संचलित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे तब्बल २९ म...
राहूरी फॅक्टरी (वेबटीम)
येथील तनपुरे कारखाना संचलित शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री.छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे तब्बल २९ महिन्याचे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
राहूरी फॅक्टरीतील छत्रपती शिवाजी इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळपास 17 कर्मचाऱ्यांचे जानेवारी 2019 ते मार्च 2021 या कालावधीतील 29 पगार थकीत असून संस्थेच्या ऑफिसमधून तुम्ही राजीनामा द्या व करारावर सही करून 70 टक्के प्रमाणे पगार घेऊन जा असे फोन येतात. गरीब कुटुंबातील सर्व कर्मचारी असल्याने प्रामाणिकपणे सेवा केली असताना पूर्ण थकीत पगार देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बँकेच्या खात्यात पैसे असतानाही आमचे पगार राजीनामा देत नसल्यामुळे अदा करत नाही.
10 जुलै पर्यंत थकीत पगार अदा करून कर्मचाऱ्यांना शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतर ठिकाणी सामावून न घेतल्यास 11 जुलै वेगवेगळ्या ठिकाणी।आत्महदन करणार असल्याचा इशारा संस्थेचे प्रशासकी अधिकारी व प्राचार्य यांना कर्मचाऱ्यांनी दिला आहे. यावेळी अशोक सागर, शशिकांत म्हसे, सुनील आढाव, प्रसाद लोखंडे, बाळासाहेब आढाव, ज्ञानेश्वर म्हसे, प्रदीप वराळे, माधव कोकाटे आदीसह कर्मचारी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत