कोपरगावात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी आ.कोल्हे यांचे मानले आभार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात केंद्रीय मंत्री गडकरी आणि माजी आ.कोल्हे यांचे मानले आभार

 कोपरगांव : प्रतिनिधी    साईबाबांची शिडी पुर्वी आपल्या मतदारसंघात होती, नंतर तिचे विभाजन होऊन नविन मतदारसंघ अस्तित्वात आला. जगविख्यात साईबाब...

 कोपरगांव : प्रतिनिधी

  


साईबाबांची शिडी पुर्वी आपल्या मतदारसंघात होती, नंतर तिचे विभाजन होऊन नविन मतदारसंघ अस्तित्वात आला. जगविख्यात साईबाबांचे मंदिर शिर्डी येथे त्याच्या दर्शनासाठी देश विदेशातील भाविक येतात पण रस्त्याचे हाल प्रचंड म्हणून त्याचा पाठपुरावा मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केला आणि त्यांनी सावळीविहार कोपरगांव हद्दीतील कामासाठी दीडशे कोटींचा निधी दिला हा मैलाचा दगड असुन अजुनही निधी मिळविण्यांसाठी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली. 


  कोपरगांव शहर व तालुका भाजपा तसेच मतदारसंघातील रहिवासीयांनी सौ. स्नेहलता कोल्हे यांचा जाहिर सत्कार करून केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितिन गडकरी यांचे शतशः आभार मानले त्या सत्कारास उत्तर देतांना त्या बोलत होत्या. प्रारंभी विजय आढाव यांनी प्रास्तविक केले. 


 याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्य साहेबराव रोहोम, कोल्हे कारखान्याचे  संचालक प्रदीप नवले, माजी सभापती सुनिल देवकर, मच्छिंद्र केकाण, शहराध्यक्ष दत्ता काले, विनोद राक्षे, रवि रोहमारे, संदिप देवकर, नवनाथ आगवण, मयुर राऊत, दादा नाईकवाडे, मनिष देवकर, देविदास भिंगारे, सतिष केकाण, संतोष भिंगारे, अनुराग येवले, मनोज तुपे, अविनाश मालकर, विनोद परदेशी, बापू सुराळकर, प्रविण भासले, किशोर दरेकर, अंकुश भिंगारे, मंगेश जाधव आदि उपस्थित होते.

   नगर-मनमाड महामार्गाची पावसामुळे दुरावस्था झाली या रस्त्याचे काम व्हावे म्हणुन  राज्य शासनाकडे असंख्यवेळा मागणी केली, पण काम होत नव्हते साईभक्तांसह अन्य वाहनधारकांना त्याचा त्रास होत होता, शेवटी हा रस्ता राज्य शासनाने केंद्र शासनाकडे वर्ग केला म्हणून त्यास निधीबाबत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना अहमदनगर दौऱ्यात साकडे घातल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या.

            त्यावर त्यांनी यास तात्काळ १५० कोटी रुपये मंजूर केले आणि साहिबाबा सर्वांना पावला असेही सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या. हा सत्कार आपण साईबाबांचा आर्शिवाद म्हणुन स्विकरते  आहे. अजुन खुप कामे बाकी आहेत. जनता जर्नादनांचे पाठबळ मिळत राहो व प्रश्न सुटत जावो ही अपेक्षा स्नेहलता कोल्हे यांनी शेवटी व्यक्त केली. माजी सभापती सुनिल देवकर यांनी आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत