कोपरगाव / प्रतिनिधी तब्बल २२ वर्षानंतर काही वर्गमित्र आपल्या शाळेत भेटले तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांची मैफल रंगली. सर्वांनी एकमे...
कोपरगाव / प्रतिनिधी
तब्बल २२ वर्षानंतर काही वर्गमित्र आपल्या शाळेत भेटले तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पांची मैफल रंगली. सर्वांनी एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत आता नेहमीच संपर्कात राहण्याची ग्वाही दिली.
कोपरगाव येथील कर्मवीर भाऊराव पाटील या शिक्षण संस्थेतील सन १९९९-२००० या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे छोटेखानी स्नेहसंमेलन शुक्रवारी (ता.२०) अचानक करण्याचे योजिले. यावेळी संस्थेचे माजी शिक्षक श्री. डोईफोडे आणि श्री. कसबे यांना आवर्जून आमंत्रित केले होते. यावेळी बोलताना डॉ. न्यायाधीश विक्रम आव्हाड म्हणाले आमच्या यशात के. बी. पी. विद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे, आज जो काही आहे तो आमच्या शिक्षकांमुळे आणि विद्यालयामध्ये आहे. बालपणीचे मित्र हे आयुष्यातील मोठी संपत्ती आहे आणि या विद्यालयातून शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत काम करत असून त्यांनी नावलौकिक मिळवला आहे.
यावेळी उपस्थित न्यायाधीश विक्रम आव्हाड, गावचे पाटील सोमेश आढाव, उत्कृष्ट खेळाडू विजय आहेर, युवा उद्योजक अनिल हरणे, व्यापारी गुड्डूभाई मन्सुरी यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विजयी घोषण दिल्या. तोच कार्यक्रम सुरू असताना बजरंग जाधव, महेश पवार, संतोष आढाव, रुपेश शिरोडे, विकास खेडकर, एजाज मन्सुरी, अनिल गाडे, दत्तात्रय पवार, गौरव पवार, किरण कर्डक, दीपक कांदळकर, मुस्ताक पठाण यांच्या संकल्पनेतून शाळेच्या आवारात डॉ. न्यायाधीश विक्रम आव्हाड, प्रा. डोईफोडे सर व प्रा. कसबे सर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून अशीच हरित क्रांती कायम करीत राहू अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य करीत २२ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सर्व सहकारी मित्र भेटल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. दरम्यान,
न्या. विक्रम आव्हाडांचा पीएच. डी. मिळविल्याबद्दल वर्गमित्रांनी सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुड्डूभाई मन्सुरी यांनी केले तर फोनच्या विनंतीला मान देऊन आपला मौलिक वेळ दिल्याबद्दल चेतन गवळी यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत