येवला(वेबटीम) छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन 350 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने अनुलोम संस्था व बाबासाहेब डमाळे मित्र मंड...
येवला(वेबटीम)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होऊन 350 वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने अनुलोम संस्था व बाबासाहेब डमाळे मित्र मंडळ यांच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन पंधरवडा दिनांक 2 जून पासून येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती बाबासाहेब डमाळे यांनी दिली.
"शिवराज्याभिषेकाचा पराक्रम" म्हणून अनुलोम संस्थेचे महाराष्ट्राचे प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार स्वानंदजी ओक यांनी तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुकुंद गंगापूरकर,प्रभाकर झळके सर यांच्या हस्ते तर हिंदू साम्राज्य दिन पंधरवडाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते होतआहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्ष पूर्ण होतअसताना महाराष्ट्र शासनासहअनेक राजकीय पक्ष,सामाजिक व शिवप्रेमी संघटना यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.विशेष म्हणजे यावर्षी परदेशात अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे.दुबई सरकारने प्रथमच आशा कार्यक्रमास परवानगी दिलेलीआहे.महाराष्ट्र सरकार हि प्रत्येक तालुक्याला हा शासकीय कार्यक्रम साजरा करणार आहे.
अनुलोम ही संस्था उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्य करत आहे.महाराष्ट्राचे काम स्वानंदजी ओक,सुजाता मराठे तर विभागीय काम विक्रांत पाटील तर येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे कामकाज संतोष चव्हाण,जयप्रकाश वाघ व अन्य मंडळी बघत आहे. त्यांना बाबासाहेब डमाळे मित्र मंडळाचे सहकार्य असते, बाबासाहेब डमाळे मित्रमंडळाच्या वतीने आत्तापर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर,मोफत नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर, सैनिकांच्या कुटुंबीयांच्या घरी दीपावली साजरी करताना कपडे फराळवाटप, कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप,बेरोजगार मेळावा घेऊन युवकाना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणे,मोफत इ-स्रम कार्ड वाटप,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणे,पालखेड पाणी प्रश्न,चारी क्रमांक 46 ते 52 पाणीआणणे, दुरुस्तीसाठी प्रयत्न करणे पुणेगाव-दरसवाडी,डोंगरगाव पोहोच कालवा प्रश्नावर पाठपुरावा करणे,देव नदीची खोदाई करून पाणीसाठा वाढविणेअशाप्रकारेअनेक सामाजिक उपक्रम येवला- लासलगाव मतदार संघात राबविलेले आहेत.
येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात हिंदू साम्राज्य पंधरवडा दिन साजरा करताना ठिकठिकाणी ध्वज उभारणे,महाराजांचे प्रतिमा पूजन करणे,पुस्तिका वाटप करणे,स्थानिक पातळीवर व्याख्याने,प्रवरचने करणे, शिवप्रेमी,साधुसंत व विविध क्षेत्रात काम करणारे,विविध समाजाच्या ज्येष्ठांच्या भेटी घेऊन त्यांचा सन्मान करणे,विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य उपक्रम साजरे करणारआहे.अशी माहिती बाबासाहेब डमाळे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत