शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका"- ॲड. नितिन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका"- ॲड. नितिन पोळ

कोपरगाव(वेबटीम) वाढत्या महागाईने शेती व शेतकरी उध्वस्त झाला असून या काही न बोलणाऱ्याना व निवडणूकी पुरते तोंड दाखवणाऱ्या उमेदवारांना गावात फि...

कोपरगाव(वेबटीम)



वाढत्या महागाईने शेती व शेतकरी उध्वस्त झाला असून या काही न बोलणाऱ्याना व निवडणूकी पुरते तोंड दाखवणाऱ्या उमेदवारांना गावात फिरवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका असा मत बहुजन भारत पार्टी चे उमेदवार ॲड नितीन पोळ यांनी व्यक्त केले 

ज्यांनी पंधरा वर्षात तालुक्याच्या शेतीच्या पाणी प्रश्नावर, कांद्याच्या भावावर, विजेच्या प्रश्नावर, उसाच्या भावावर पाट पाण्यावर एक एक शब्द बोलले नाही,शेती करीता लागणारी खते महाग झाली, डिझेल भाववाढीने शेती मशागत करणे अवघड झाले.शेती मालाला भाव नाही या खासदारांनी एक ब्र शब्द संसदेत उच्चारला नाही असे असताना तालुक्यातील अनेक मतदार भर सभेत प्रश्न उपस्थित करत आहे शेतकरी आपली चीड व्यक्त करत आहे मात्र स्थानिक नेते त्या उमेदवाराला मत दया अशी मागणी करत आहे.

 मात्र त्या उमेदवारांना जनतेने प्रश्न विचारल्यावर वाईट वाटत असेल तर पंधरा वर्षात तोंड न उघडणाऱ्या उमेदवारांना जनतेकडे मत मागून किमान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका शेतकरी हा आक्रोश मत पेटीतून व्यक्त करणार याची खात्री आहे असे मत शिर्डी लोक सभा मतदार संघातील बहुजन भारत पार्टी चे उमेदवार ॲड. नितिन  पोळ यांनी व्यक्त केले असून मतदार या वेळी दोन्ही उमेदवारांना घराचा रस्ता दाखवून देतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत