देवळाली प्रवरा(वेबटीम) पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय,माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, समर्थ बाबूराव ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय,माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, समर्थ बाबूराव पाटील महाराज की जय च्या जयघोषात,हातात भगवी पताका घेतलेले वारकरी व डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला,पांडुरंगाच्या नामघोषात तल्लिन झालेले शेकडो वारकरी, ढोलताशांच्या गजरात व तोफांची सलामी देत पुष्षहारांनी सजविलेल्या पालखी रथातून ग्रामदैवत श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या पादूका घेऊन सकाळी ११ वाजता बाजारतळावरील समर्थ बाबुराव पाटील यांच्या मंदिरा पासून दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपूर कडे आषाढीवारी साठी प्रस्थान झाले.
सकाळी प्रथम दिंडीचे अध्यक्ष दत्तात्रय कडू पाटील यांच्या हस्ते सपत्नीक समर्थ बाबूराव पाटील महाराज मंदिरात महाराजांच्या पादूकांचे विधीवत पूजा, आरती करुन पालखी रथात स्थापना करण्यात आली. या वेळी देवळाली प्रवरासह चिंचपूर,गोंधवणी,टाकळीमिया येथिल भजनीमंडळानी आपली सेवा सादर केली. पौराहित्य दिनेश जोशी यांनी केले. यावेळी
बोलतांना दत्तात्रय कडू पाटील म्हणाले,दिंडीचे हे १४ वे वर्ष आहे.दिंडीत कुठल्याही प्रकारची भिशी दिंडीत सामिल होणाऱ्या वारकऱ्यां कडून घेत नसल्याने दरवर्षी दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढती आहे.यंदा देखील मोठ्या संख्येने पंचक्रशीतील वारकरी दिंडीत सहभागी झाले असून यंदा महिला वारकऱ्यांची संख्या जास्त आहे. या नंतर महाराजांची आरती करुन दिंडीचे श्रीक्षेत्र पंढरपुर कडे प्रस्थान झाले.या वेळी दिंडीला निरोप देण्यासाठी डॉ. तनपूरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, अजिंक्य कडू,गोरक्षनाथ महाराज शिंदे,वाडकर महाराज,दुर्गाप्रसाद तिडके महाराज, बाजीराव खांदवे,शिवराम कडु,भागवत मुसमाडे, मंदाबाई लव्हाट,भिमा तेलोरे,सोसायटीचे संचालक उत्तम मुसमाडे,कुंडलीक खरात,देवराम कडू,चोपदार अशोक गवळी,उत्तमराव कडू,आप्पासाहेब ढुस,शिंदेमामा, विश्वास कडु, वैभव गिरमे,केदारनाथ चव्हाण,नगरपरिषदेचे नंदू शिरसाठ, जगन्नाथ येवले,अरुण ढुस,बाबासाहेब मुसमाडे, चोपदार भाले मामा,अनंत कदम,शैलेंद्र कदम,डॉ. पांडु मुसमाडे, डॉ. नामदेव कडु,भाऊसाहेब गडाख,आदीसह देवळाली प्रवरा शहरवाशीया सह पंक्रोशीतील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराजांची आरती लिहीणारे भुमकर सर यांचा सन्मान करण्यात आला तर सालाबादप्रमाणे यंदा ही मुसलिम पंच कमीटीच्या वतीने सिराज सय्यद,मौलाना अकील पटेल,अकबर शेख,शाकीर तांबोळी यांनी दत्तात्रय कडू पाटील यांचा सन्मान केला.यंदा शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी दिंडीला टंकर दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत